मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

फुलांशी हितगुज ......

नदीच्या काठी उभी मी एकटी वाट अजूनही पाहते,
कधीतरी येशील परत हेच आजही मन सांगते......

माहिती आहे मला नाही तू माझ्या आयुष्यात,
तरीही मी तुझीच आहे पाहीन आयुष्य भर वाट.....

रोज हेच होत आहे तरी नाही दिसत तू मला,
आणी मग रुसून बसली की फुले विचारती मला....

प्रत्येक वेळी विचारत रोज एकच प्रश्न,
कोण आहे असा तो ज्याचत तू मग्न.....

मग मी हि उत्तर देते त्यांना....

तो आहे असा की ज्याची नाही तुलना,
पण मनात त्याचा नाही माझी गणना.....

तरी ही मी घाबरत नाही दुःखाच्या वादळाला
अजून ही मी स्थिर आहे सांगते त्या पाषाणाला....

दूर गेलास निघुनी तरी आहेस जवळ माझ्या,
असे कसे लोटू त्याला दुःखाच्या सगरात माझ्या.....

असे काय घडले गुन्हे जे नाही तुम्ही एकत्र,
प्रश्न विचारी फुले सतत हेच रोज मात्र.....

आज सांगते म्हणाली त्यांना तुमच्या प्रश्नाचे उत्तर,
ऐका नीट डोळे कान उघडे ठेवून.....

घाव माझे हे फुलांनो विचारू नका,
आणी सांगीतले
जरी तुम्हास तर शाहरू नका.....

उत्तर देताच फुले आश्चर्याने म्हणाली,
आज कळतेय की तू का एकटी उभी किनारी....

मन आजही न्हातेय त्याचा आठवणीत,
आणी मग पाहतो नेत्रात तुझ्या साठवलेले अश्रू.....
त्याच्या  आठवणीत........

अंतरी माझ्या

काहीतरी सांगून गेलीस तू .... 


पण मनास उमगत नाही काही,
कसे आवरू स्वतःला आज ही भरकटत आहे.....


तुझ्या विना जगणे अशक्य आहे.... 

कसे सांगू तुला कहीच कळत नाही.

तूच माझा जगण्याचा आधार ....

तूच माझी जीवनाची ढाल.

परी अंतरी माझ्या..... 
तुझ्याच सुरांची चाल.


आहेस अशी कोण माझी..... 
नाही सांगू शकत शब्दात....


बघ एकदा वाकून मनात,
येईल तुला माझ्या शब्दांची हाक.........

माझा शोध

माझ्या एका श्वासात जग सारे तुझे भरुनी...
माझ्या एका हुंदक्यात जग सारे गेल तुला सोडूनी....

कधी होतीस तू माझी असे हे मनाचे अवचट कटू बोल .....
काय करू कसे समजावू कळे न मला आज......
मन इतके अस्थिर कि हरवू लागली वाट......

दिवस रात्रीच्या खेळात वर्ष गेले सरुनी....
अजून ही मी शोधात आहे तुला जवळ ठेवुनी....

तुझ्या स्मृतीत....

मन माझे झुरत आहे तुझ्या स्मृतीत....
हो नाही ची अवचट कोडी आज हि मुठीत.....

तू हो म्हण नाहीतर नाही.....
तू होतीस तशीच राहा असे ही म्हणत नाही.....

तरी तू हवी आहेस माझ्या आयुष्यात.....
जा असा ही म्हणणार नाही .......

पहिल्यांदा आज दुरी तुझी भासत आहे.....
मन आज पहिल्यांदा नसल्याचा भासत आहे......

का कळेना.....

कधीतरी असावे कोणी आपल्यासाठी, 
पलीकडल्या बाजूला
दूर नदीच्या काठावर, 

रागावून बसलेला........

कसे कळेना त्यास....

हे झाले असे का आयुष्य
मनातल्या कोडी मनात अडकलेल्या.......

सोडवता नाही जमले हे गुंते, 

म्हणून नदी काठी बसलेला
आज हि तो त्या गुंत्यात अडकलेल्या.......

अस मी तिला कितीदा पाहिलेलं........

ती एका कोनाडयात बसलेली, 
स्वतः मध्ये हरवलेली
अस मी तिला कितीदा पाहिलेलं........


सारे काही पाहत असताना देखील, 
मन माझे झुरत होते,
पण विचारायचे काय, 

हे कोडे अजून बाकी होते,

शब्दकोशात माझ्या मला उल्घडला सूर नवा,
जणू काही पौर्णिमेचा चंद्रमा.......
गर्द निळ्या आकाशात, 

झुले पक्ष्यांचा थवा,
आणी सागराला मिळे प्रेमाची ऊबदार हवा......


तरीही प्रश्न तोच होता....

काय आहे असे तिच्या मनात,
जे बोलताच क्षणी.....

उडून जाईल रंग हवा......

मग मी हि निश्चय केला, 

भरला अंगात जोम नवा,
आणी धाडस करुनी विचारला प्रश्न होता जो माझ्या मना......


अगं सांग तरी का अशी कोनाडयात तू बसलेली कोणावर रुसलेली,
मंजुळ स्वरात न तिच्या ओघळल्या अश्रूंच्या झरा.....

घेत हुंदके थांबवून रडू,

सांगितली तिने तिची व्यथा....
ऐकून झालो गारद, 

जणू शब्दांनेच गिळले मला........
मोहत्ना मग प्रेमात बुडाला, 

हा विश्वाचा करुणाकरा....

अखेर ठरला डाव विजयाचा...... 

आणी मातला कंस व्यथेचा,
नियती ची अवघड कोडी सांगून गेली ....... कोण राहिला इथे भला........